शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

कोल्हापूर शहरातील निम्म्या शहरात अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:32 IST

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देउपसा केंद्रातील पंप जळालावेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता,महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले

कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी सायंकाळी जळालेला पंप दुरूस्त करून नियमित उपसा सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, आज मंगळवारपासून शहरात सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

बालिंगा तसेच शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडील पंपामध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील ई वॉर्डसह सम्राटनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, शास्त्रीनगर, महालक्ष्मीनगर, पाण्याचा खजिना, तपोवन, साळोखेनगर आदी परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली तेव्हा काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अपुºया पाणीपुरवठ्याची माहिती दिली. त्यावेळी बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रातील एक-एक पंप नादुरूस्त असल्याचे लक्षात आले.

नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकाºयांनी सोमवारी सकाळी पंप दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आणि सायंकाळपर्यंत पूर्णही केले. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत वेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता, असे परिवहन सभापती नियाज खान यांनी सांगितले. पाणीपुरवठा अपुरा होणार असेल तर त्याची माहिती नगरसेवकांसह जनतेला दिली नाही, तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून पिण्याच्या पाण्याचे टँकरही दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

नियाज खान यांच्यासह काही नगरसेवक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेरावो घालून त्यांचे वाहन काढून घेण्याच्या पवित्र्यात होते; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तत्परतेने काम करत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांतून होत आहे.

 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण